Skip to main content

कुटुंब प्रमुख

मुले आणी बायको रात्री गाढ झोपुन जातात,
अगदी निर्धास्तपणे,...
कुठलीच काळजी नसते त्यांना, त्याचे ऐकमेव कारण म्हणजे घरातला कूटुंब प्रमुख, तो जाे पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्या कुटूंबासाठी तो आधारवड असतो,
ज्या वेळी त्याचे कुटूंब निर्धास्थपणे झोपलेलं असते त्यांना विश्वास आहे आमची जबाबदारी घेणारा कुटूंबप्रमुख खंबीर आहे,
पण त्याच वेळी तो मात्र जागा असतो,
तिच ऐकमेव रात्रीची  वेळ त्याला  विचार करण्यासाठी अनुकुल असते, ....

मुलांच्या भविष्याची, कुटूंबाच्या उभारणीची,
अनेक विचाराचे चक्र त्याच्या डोक्यात थैमान घालत असते,
नकळत त्याला डोळा लागतो आणी तो झोपुन जातो, रात्री बेरात्री जाग आली तर तो मुलांकडे आणी बायकोकडे पाहत असतो, त्यांच्या अंगावरचे पांघरून सावरुन परत तो झोपतो,
उद्याचे स्वप्न पाहात ....!

पुरूष त्याच्या मनातल्या भावना पटकन बोलुन दाखवत नाही, रडता येत नाही म्हणुन कुढत आणी काळजीत जिवन जगत असतो......
ही एका कूटूंबाप्रती जबाबदार पुरूषाची लक्षणे आहेत, कुटुंब जस जसे मोठे होत जाते तशी कुटूंब प्रमुखाची जबाबदारी वाढत जाते, ......
संसार करणे आणी तो निभावने वाटते तितकी साधी आणी सोपी गोष्ट नसते.
संसाराची किंमत त्यांना विचारा ज्यांचा संसार अर्धवट राहीलाय, कधी अकाली निधनाने पुरूष तर कधी स्त्री संसारातून बाहेर पडते.....

लग्न करुन बायकोला घरी घेऊन येणे व दोन मुलांना जन्माला घालणे याला पुरूष म्हणत नाही मंडळी,
पुरूष त्यालाच म्हणतात जो कूटूंबाची पुर्ण जबाबदारी पार पाडून बायकोची आणी मुलांची सर्व स्वप्ने साकार करतो, .....
  समाज्यासाठी तुम्हाला काही करता आले नाही तरी चालेल.....!  पण स्वताःच्या बायको मुलांसाठी आपल्या आई वडीलांसाठी तुम्ही कुटूंबातले हिराे म्हणून जगला पाहीजे,
एक आदर्श पती,आदर्श बाप आणी आदर्श मुलगा हिच ओळख किमान कूटूंबाप्रती प्रत्येक पुरूषाची असावी.....
🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.

                           आजकाल जातीच्या-धर्माच्या नावावरुन एकमेकांशी भांडणारी माणसं पाहीली की मनामध्ये  सारखा एक प्रश्न येत राहतो की, 'माणसं आपल्या जातीवर जास्त प्रेम करतात की धर्मावर'?                 तेव्हा मात्र माझं मत असे आहे की, हा देश माझा आहे, ही जमीन माझी आहे, माझा जन्म या देशात झाला आहे, ज्या समाजात मी जन्मलो, वाढलो त्या समाजाविषयी मला तळमळ आहे. आज मी स्वतंत्र आहे, परंतु गेल्या ५००० वर्षांपासून अगदी काही वर्षापर्यंत तुमच्या धर्माने आमच्या समाजावर धर्माच्या नावाखाली जो काही अमानुष छळ करून भयंकर यातना दिल्या, त्या आम्ही सहजासहजी विसरणे कदापि शक्य नाही.  मी तुमच्या धर्मात जन्म घेतला असेल ही परंतु त्यात ही, मी माझ्या जातीत जन्म घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे जर का तुमच्या धर्मावर संकट आले तर तुमचा धर्म वाचविण्यासाठी आम्ही येवू या भ्रमात तुम्ही राहू नये. एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, जेव्हा भेटणारी व्यक्ती परधर्मीय असेल तेव्हा मात्र आपल्यातील धर्म  ...

रानातला माणूस

तो फक्त सेवा करतोय इथल्या काळ्या मातीची, बाकी त्याला कशाचीही पर्वा नाही. माञ तो विधाता आहे त्याला साथ देण्यासाठी हरघडी त्याच्या सोबत. सांज वेळ होते आहे, पाखरे माघारी फिरत ...

सामाजिक परिवर्तनाची नांदी...!!!

                                    सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. कोपर्डी येथील घडलेल्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा समाज एकत्रित येवून मूकमोर्चे काढतो आहे. परंतु प्रश्न असा आहे की, मराठा क्रांती मोर्चा नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल का? मला याचे उत्तर नक्कीच होय असेच वाटते. ते कोणताही मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाला म्हणून नाही किंवा या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र सरकार हादरले म्हणून सुद्धा नाही. तर जेव्हा जेव्हा एखाद्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकसंघ,एकजूटपणे प्रतिकार करतो,उठाव करतो. तेव्हा तेव्हा समाजामध्ये खूप मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे, हा इतिहास आहे.                                       सन 1972 रोजी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ पाव शतक लोटले असताना या संबंध काळात एकीकडे दलितांवर अन्याय अत्याचार होत होते. तर दुसरीकडे या जुलमाला...