Skip to main content

काळा दिवस नव्हे, संविधान सन्मान दिवस

दिडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य व स्वाभिमानाचा अर्थ समजला तो संविधानामुळे, हे तेच भारतीय  संविधान आहे जे जगात सर्वोत्तम आहे. आज या संविधानामुळेच भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. होय लोकशाही कारण इथे लोकांची सत्ता असते. हा देश कोणी चालवायचा, आपले प्रतिनिधित्व कोणी करायचे हे सर्व लोक ठरवतात. म्हणून दर पाच वर्षांनी हे लोक नेते आपण केलेल्या कामाची यादी घेवून मत मागायला शेवटी आपल्याकडे येतात. तो सर्वसामान्य नागरिक ठरवतो इथल्या व्यवस्थेचा राजा.
हे सर्व शक्य झाले ते फक्त भारतीय संविधानामुळेच.
म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस *भारतीय संविधान दिवस* म्हणून आपण साजरा करायला हवा.

26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात आपल्या जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावताना जे वीर जवान शहिद झाले त्यांना विनम्र अभिवादन. हा देश माझा आहे आणि या देशासाठी माझे प्राण गेले तरी बेहत्तर, हि शिकवण मिळते ती फक्त याच महाराष्ट्राच्या मातीतुन आणि भारतीय संविधानातुन. ज्या वीर जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्यांचा स्मृतीदिन *काळा दिवस* म्हणून पाळण्यापेक्षा त्यांच्या राष्ट्रभावनेचा आदर करून हा दिवस *भारतीय संविधान दिवस* म्हणून साजरा करावा हि विनंती.
बाकी मुंबई वरती झालेला भ्याड हल्ला आम्ही कदापी विसरणार नाही,
सुन ले पाकिस्तान...
मौका सभी को मिलता है
बारी तेरी भी आयेगी...

Comments

Popular posts from this blog

मला धर्मापेक्षा माझी जात प्रिय आहे.

                           आजकाल जातीच्या-धर्माच्या नावावरुन एकमेकांशी भांडणारी माणसं पाहीली की मनामध्ये  सारखा एक प्रश्न येत राहतो की, 'माणसं आपल्या जातीवर जास्त प्रेम करतात की धर्मावर'?                 तेव्हा मात्र माझं मत असे आहे की, हा देश माझा आहे, ही जमीन माझी आहे, माझा जन्म या देशात झाला आहे, ज्या समाजात मी जन्मलो, वाढलो त्या समाजाविषयी मला तळमळ आहे. आज मी स्वतंत्र आहे, परंतु गेल्या ५००० वर्षांपासून अगदी काही वर्षापर्यंत तुमच्या धर्माने आमच्या समाजावर धर्माच्या नावाखाली जो काही अमानुष छळ करून भयंकर यातना दिल्या, त्या आम्ही सहजासहजी विसरणे कदापि शक्य नाही.  मी तुमच्या धर्मात जन्म घेतला असेल ही परंतु त्यात ही, मी माझ्या जातीत जन्म घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे जर का तुमच्या धर्मावर संकट आले तर तुमचा धर्म वाचविण्यासाठी आम्ही येवू या भ्रमात तुम्ही राहू नये. एक गोष्ट स्पष्ट जाणवते की, जेव्हा भेटणारी व्यक्ती परधर्मीय असेल तेव्हा मात्र आपल्यातील धर्म  ...

रानातला माणूस

तो फक्त सेवा करतोय इथल्या काळ्या मातीची, बाकी त्याला कशाचीही पर्वा नाही. माञ तो विधाता आहे त्याला साथ देण्यासाठी हरघडी त्याच्या सोबत. सांज वेळ होते आहे, पाखरे माघारी फिरत ...

सामाजिक परिवर्तनाची नांदी...!!!

                                    सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाजाचे मूकमोर्चे निघत आहेत. कोपर्डी येथील घडलेल्या पार्श्वभूमीवर सर्व मराठा समाज एकत्रित येवून मूकमोर्चे काढतो आहे. परंतु प्रश्न असा आहे की, मराठा क्रांती मोर्चा नव्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल का? मला याचे उत्तर नक्कीच होय असेच वाटते. ते कोणताही मोर्चा लाखोंच्या संख्येने निघाला म्हणून नाही किंवा या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्र सरकार हादरले म्हणून सुद्धा नाही. तर जेव्हा जेव्हा एखाद्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण समाज एकसंघ,एकजूटपणे प्रतिकार करतो,उठाव करतो. तेव्हा तेव्हा समाजामध्ये खूप मोठे सामाजिक परिवर्तन घडले आहे, हा इतिहास आहे.                                       सन 1972 रोजी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ पाव शतक लोटले असताना या संबंध काळात एकीकडे दलितांवर अन्याय अत्याचार होत होते. तर दुसरीकडे या जुलमाला...